Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार आत्ताच अवकाळी पाऊस आणि गारपिट नुकसान भरपाई संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दहा दिवसांमध्ये अवकाळी नुकसान भरपाईची रक्कम देणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी सांगितले आहे. पीक नुकसान भरपाईची रक्कम सरकार द्वारे शेतकऱ्यांना किती दिले जाणार आणि कोणत्या निकषावर रकमेचे वाटप करणार आहेत. हे आपण आज सविस्तर पाहूया. महाराष्ट्र राज्यभरात मागील दोन महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची अशी घोषणा केली आहे. सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होऊन एक महिना झाला आहे, परंतु अजूनही राज्यात...