Skip to main content

Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार

 Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई  :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार


       आत्ताच अवकाळी पाऊस आणि गारपिट नुकसान भरपाई संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दहा दिवसांमध्ये अवकाळी नुकसान भरपाईची रक्कम देणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी सांगितले आहे. पीक नुकसान भरपाईची रक्कम सरकार द्वारे शेतकऱ्यांना किती दिले जाणार आणि कोणत्या निकषावर रकमेचे वाटप करणार आहेत. हे आपण आज सविस्तर पाहूया. 

        महाराष्ट्र राज्यभरात मागील दोन महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची अशी घोषणा केली आहे.

        सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होऊन एक महिना झाला आहे, परंतु अजूनही राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला अवकाळी नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही.  

त्या संदर्भात सर्व शेतकरी राज्य सरकारकडे प्रश्न करत होते नुकसान भरपाई कधी मिळणार?

      अखेर या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

       राज्य सरकार कडून आज घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे, पुढील दहा दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांना सरसकट अवकाळी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

       राज्यभरातील 70% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत, उर्वरित पंचनामे एक ते दहा दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सरकार द्वारे सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

       सर्व शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत ही NDRF च्या निकषा पेक्षा जास्त दिली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्बदुल सतार यांनी दिली आहे. याचाच अर्थ असा होतो की दहा दिवसाच्या आत राज्यातील उर्वरित पंचनामे पूर्ण होणार आहेत आणि दहा दिवसानंतर अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारद्वारे नुकसान भरपाई मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...