Skip to main content

एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ; मंत्रिपदाचा दुरुपयोग

एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ; मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचं हायकोर्टाचं.

          उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात खडसे यांचे जावाई चौधरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात अपील केलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबई :

          महसूलमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांना जनहिताचे रक्षण करण्याचे किंवा जनहिताचा निर्णय घेण्याचे अधिकार होते, यात वाद नाही. मात्र, अशा अधिकारांचा स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबीयांच्या लाभासाठी उपयोग केला जाऊ शकत नाही. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात ज्याप्रकारे त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले ते प्रथमदर्शनी जनहितासाठी नव्हे, तर स्वत:च्या किंवा स्वत:च्या निकटवर्तीयांच्या वैयक्तिक लाभासाठी होते, असे दिसते', असे प्रथमदर्शनी निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

          खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशात न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हे निरीक्षण नोंदवले. चौधरी यांचा अर्ज १० एप्रिल रोजी फेटाळण्यात आला होता. त्या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. या आदेशातील निरीक्षणांमुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात चौधरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाण्याची शक्यता आहे.

         पुण्याजवळच्या भोसरीमधील उकानी कुटुंबाच्या जमिनीची संपादनाची प्रक्रिया एमआयडीसीने आधीच केली होती. शिवाय ती जमीन एमआयडीसीच्या ताब्यात होती. तरीही खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई चौधरी यांनी उकानी कुटुंबासोबत २८ मार्च २०१६ रोजी ५० लाख रुपयांचा खरेदी करारनामा केला. नंतर ती जमीन त्यांनी उकानी यांच्याकडून तीन कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतली. परंतु, मुद्रांक शुल्क व कुलमुखत्यारपत्राचे मुद्रांक शुल्क सुमारे एक कोटी ७८ लाख रुपये भरले. म्हणजेच त्या जमिनीचे बाजारमूल्य तब्बल २२ कोटी ८३ लाख रुपये होते.



         विक्री करारनामा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तत्कालीन महसूलमंत्री खडसे यांनी एमआयडीसी व महसूल अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या जमिनीची भरपाई जमीन मालकांना द्या किंवा जमीन परत द्या, असा आदेश दिला. शिवाय उकानी कुटुंबाला जमिनीचे पैसे देण्यासाठी वैध पैशांचा वापर झाल्याचे दाखवण्याच्या उद्देशाने मंदाकिनी व चौधरी यांनी मेसर्स बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीकडून चार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे दाखवले. मात्र, प्रत्यक्षात बेंचमार्क कंपनीकडे त्यांनीच पाच कागदोपत्री कंपन्यांमार्फत पैसे पाठवले. अशा प्रकारे आरोपींनी पाच कोटी ५३ लाख रुपये अवैध मार्गाने पेरले, वळवले आणि त्याद्वारे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा केला', असा आरोप सक्तवसुली संचालनालयाने  ठेवला आहे.

       दरम्यान, ईडीने याप्रकरणी चौधरी यांना ७ जुलै २०२१ रोजी अटक केली. तेव्हापासून ते गजांआड आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात हा अर्ज केला होता.....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...