Skip to main content

मनमाडला श्री स्वामी समर्थ महाराज सभामंडपासाठी ६५ लाखांच्या निधीची आ. सुहास कांदेंची घोषणा

मनमाडला श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी ..


      सभामंडपासाठी ६५ लाखांच्या निधीची आ. सुहास कांदेंची घोषणा.


       मनमाड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीच्या अनुषंगाने आयोजित सप्ताहानिमित्त आ. सुहास कांदे यांनी श्री दत्त मंदिरात विधिवत पूजन केले. मंदिरासाठी ६५ लाख रुपयांचा सभामंडप बांधून देण्याचे आ. कांदे यांनी यावेळी जाहीर केले. याबद्दल भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.

        दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या दिडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त दि. १२ ते १८ एप्रिलदरम्यान अखंड नामजप, प्रहारे, यज्ञ, श्री गुरुचरित्र व श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी दुग्धाभिषेक, पूजा, पारायणसमाप्ती, होम हवन, विष्णुसहस्रनाम, महाआरती व प्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समर्थ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

      याप्रसंगी सेवेकरी बांधवांनी आ. सुहास कांदे यांचे स्वागत केले. करंजवण पाणी योजनेचे काम वेगाने सुरू असून, या मागे श्री स्वामी समर्थांचाच आशीर्वाद असल्याचे आ. कांदे यावेळी म्हणाले. सभामंडपासाठी आधी मंजूर केलेला ४० लाखांचा निधी वाढवून तो ६५ लाख करीत असल्याचे सांगत, लवकरच सभामंडपाचे उपस्थित होते..
काम सुरू होईल, असेही कांदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, तालुका समन्वयक महावीर ललवाणी, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख आसिफ शेख, अल्ताफ खान, बबलू पाटील, वाल्मीक आंधळे, लोकेश साबळे, अजिंक्य साळी, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, प्रसिद्धिप्रमुख नीलेश व्यवहारे आदींसह भाविक उपस्थित होते...Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...