पंजाबराव डखचा अंदाज अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबराव डख हे वारंवार शेतकऱ्यांना महत्वपूर्ण अशी माहिती देतात. त्यामुळे शेतकरी अगोदरच पुढील तयारी करतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळले जाते. त्यामुळे पंजाबराव डख हा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आज २६ एप्रिल पासून पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
पावसाचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार आहे?
पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, या पावसाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत व्यक्त होत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत. तर काही जिल्ह्यात हळद काढणी देखील सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे.
पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे?
पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या अंदाजानुसार २६ एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ते दोन मे पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची तीव्रता कमी राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. डखं सांगतात की, आजपासून २ मे पर्यंत बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच काही महाराष्ट्र जिल्ह्यात गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत चालली आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी आणखी बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडणार आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे काही प्रमाणात नुकसान कमी होईल, यासाठी पंजाबराव डख कायमच मदत करतात. सदर अंदाजानुसार सर्वांनी काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे.

Comments
Post a Comment