Skip to main content

अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज.

पंजाबराव डखचा अंदाज अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज.

    महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबराव डख हे वारंवार शेतकऱ्यांना महत्वपूर्ण अशी माहिती देतात. त्यामुळे शेतकरी अगोदरच पुढील तयारी करतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळले जाते. त्यामुळे पंजाबराव डख हा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आज २६ एप्रिल पासून पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

पावसाचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार आहे?

    पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, या पावसाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत व्यक्त होत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत. तर काही जिल्ह्यात हळद काढणी देखील सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे.

 पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे?

      पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

       पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या अंदाजानुसार २६ एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ते दोन मे पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात ही पावसाची शक्यता राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची तीव्रता कमी राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. डखं सांगतात की, आजपासून २ मे पर्यंत बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.



       तसेच काही महाराष्ट्र जिल्ह्यात गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत चालली आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी आणखी बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडणार आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे काही प्रमाणात नुकसान कमी होईल, यासाठी पंजाबराव डख कायमच मदत करतात. सदर अंदाजानुसार सर्वांनी काळजी घ्यावी असे ही सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...