Skip to main content

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचात चर्चा

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचात चर्चा.

        बारसू रिफायनरी मुद्द्यावरुन राज्यात चांगलच राजकारण तापलेल असतानाच आता अजित पवारांनी यावर मोठं विधान केले आहे. 'वेळ पडल्यास मी स्वत: बारसूमध्ये जाणार' असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यावेळी अजित पवारांनी मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

       अजित पवार म्हणाले, कोणताही प्रकल्प करत असताना त्याचा निसर्गावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारने घ्यायला हवी. तसेच पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास या प्रकल्पामुळे झाला नाही पाहिजे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेचा फायदा होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या बाजूने भूमिका घेणार असल्याचे यावेळी ठामपणे अजित पवारांनी सांगितले.

       त्या ठिकाणी स्थानिक आंदोलकांचा विरोध कशासाठी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. जर सर्व जनतेचा फायदा होणार असेल, तर या प्रकल्पाबाबत आंदोलकांनी समजून घेतले पाहिजे. तसेच राज्य सरकारने ही आंदोलकांनशी चर्चा करुन त्यांचे होणारे गैरसमज दूर केले पाहिजेत. याबाबत तेथील स्थानिकांशी चर्चा करुनच प्रकल्प करावेत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.


या प्रकल्पाबाबत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा काय झाली?

       त्याच प्रमाणे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक जनतेला रोजगार निर्माण होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक रोजगारासाठी बाहेर जाणार नाहीत. या संदर्भात सर्व चर्चा माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झाली आहे. त्यामुळे वेळ पडली तर बारसूमध्ये जाणार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत.

      या बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ज्या त्या पक्षाची वेगळी भूमिका असू शकते ते मला मान्य आहे. तसेच ठाकरे गटाचे संजय राऊत आणि राजन साळवी यांची भूमिका वेगळी आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कायम राजकारणाचा पुढे जाऊन विकासाच्या बाजूने भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वेळ पडली तर बारसूमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रिफायनरी प्रकल्प काय आहे? 
     हा रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असणार आहेत. यासोबतच आखाती देशांच्या सौदी अरमाओ आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत.

स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध का करत आहेत?
      या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांची फळझाडे नष्ट होतील असेही त्यांनी सांगितले आहे. रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे तेथील नद्यांचे पाणी प्रदूषित होईल. त्याचा थेट परिणाम त्यांचा मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...