Deepak Kesarkar On Teachers Recruitment: पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार
Deepak Kesarkar On Teachers Recruitment: पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, "पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच आधार पडताळणी विद्यार्थ्यांची पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात स्पष्ट आकडा कळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आज झालेल्या एबीपी माझा शी संवाद यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती सांगितली आहे.
या सदर शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. तरी नवीन शैक्षणिक वर्ष हे जून मध्ये सुरू होते. तरी पहिल्या टप्प्यात तब्बल 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार पेक्षा अधिक शिक्षकांची भरती केली जाणार आहे. आधार पडताळणी विद्यार्थ्यांची पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात स्पष्ट आकडा कळणार आहे. १००% शिक्षकांची शिक्षक भरती केली जाणार आहे. त्यासाठी संच मान्यता गरजेची आहे ती होणे गरजेचे आहे. कारण सदर पद भरती ही आरक्षणानुसार होणार आहे. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल." तर शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले.
शिक्षकांच्या बदली संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ही दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तसेच सर्व माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, परंतु जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, याबाबत ही विचार करणार असे केसरकर यांनी यावेळी सांगितले आहे.
शिक्षकांची बदली झाली नाही, तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल, तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असे दीपक केसरकर म्हणाले.
'एकच युनिफॉर्म बाबतच्या निर्णया संदर्भात एक-दोन दिवसात विचार करु'
तसेच विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्म बाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात २ ते ३ दिवसात आम्ही विचार करणार आहे आणि त्यानंतर ठरवले जाईल, असे दीपक केसरकर यांनी यावेळी स्षष्ट केले आहे. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत, त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. आताा स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म ही दिला, तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत, असे ही यावेळी सांगण्यात आले आहे......Read more
Comments
Post a Comment