Skip to main content

शिवरायांचा पुतळा आता सातासमुद्रा पार ! देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी रवाना.

शिवरायांचा पुतळा आता सातासमुद्रा पार ! देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी रवाना.

        मॉरिशसचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, काही सामंजस्य करार सुद्धा होणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सातासमुद्रापार लोकार्पण सोहळा होणार आहे.

  

        अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा आता सात समुद्र पार उभारण्यात येत आहे. शिवरायांनी केलेले महान कार्य जगामध्ये पोहोचावे यासाठी अनेक शिवभक्त प्रयत्न करत आहेत. तसेच सरकार देखील असे प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये युनिव्हर्सिटी मध्ये शिकवले जात आहे. ज्यांच्या जीवनातून समाजातील प्रत्येक घटकाला शिकण्यासारखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. युगपुरुषाचा पुतळा सातसमुद्रा पार उभारण्यात येत असून हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.



      हा सोहळा सातासमुद्रापार मॉरिशमध्ये होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.

       सातासमुद्रापार मॉरिशसमध्ये आपले महाराष्ट्रातील सुमारे ७५ हजार मराठी बांधव आहेत. सर्व मराठी बांधव महाराष्ट्रातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी सातासमुद्रापार आपली मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना आहेत असे सांगण्यात आले आहे. या सर्व ५४ संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनची स्थापना १ मे १९६० रोजीच झाली आहे. आपल्या महाराष्ट्रातील शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे केले जातात. येथे या संघटना मार्फत एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही त्यांचा मागण्या आहेत. 
        आजचा दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात असे सांगितले जात आहे. या टप्पा-२ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता देखील दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी ८ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी चर्चा करण्यात आली होती. 
       सदर दौर्‍यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भेटणार आहेत. यामध्ये काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात सर्वसामान्य जनतेला पर्यटन अणि उद्योग क्षेत्रात महत्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वी राजसिंग रुपून यांची सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट घेणार आहेत.

        परदेशात सातासमुद्रापार महाराष्ट्राचा अभिमान चांगलाच वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत ऊस्तूकता देखील लागली आहे असे जनतेकडून सांगण्यात आले आहे.


मॉरिशस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कोणते महत्वाचे निर्णय घेतले?

     मॉरिशस मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या १२ फूट उंची अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ यांनी केले. येथील मराठी फेडरेशनला ८ कोटी रुपये, १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व मराठी बांधवांसाठी कक्ष स्थापण करणार असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...