Skip to main content

अहमदनगर मधील मतदारांना दहशतीने सहलीला पाठवल्याची 'मविआ'ची तक्रार

अहमदनगर मधील मतदारांना दहशतीने सहलीला पाठवल्याची 'मविआ'ची तक्रार.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती लोकसत्ता प्रतिनिधी.

अहमदनगर

     नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार  हे मतदारांवर दहशत निर्माण करून बळजबरीने बुऱ्हाणनगर येथे बोलवून घेवुन, दमदाटी करून मतदारांना सहलीवर पाठवत आहेत. बळजबरीने सहलीला पाठवलेल्या मतदार व त्यांच्या कुटुंबाला काही झाल्यास त्यास जबाबदार राहतील, असे निवेदन नगर तालुका महाविकास आघाडीचा कार्कर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

       या दिलेल्या निवेदनावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संदेश कार्ले, शरद ढगे, संगीता ठोंबरे, राजेंद्र भगत, संदीप कर्डिले, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, महेंद्र शेळके, रामेश्वर सोलट यांच्या सह्या आहेत.

      सदर निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्ट कारभार महाविकास आघाडीने वेळोवेळी उघड केला आहे. अनधिकृत गाळे विक्रीतून सत्ताधाऱ्यांनी मोठा निधी कमावला तसेच बाजार समितीच्या वार्षिक उत्पन्नावर डल्ला मारत मलिदा यामागील काळात खाल्ला आहे. याचा जाब मतदार सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना विचारत आहेत. सध्या परिस्थिती बघता महाविकस आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

     नगर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. ती भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या हातून वाचवण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुकीत उतरली आहे. आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांची साथ महाविकस आघाडीला मिळाली आहे. त्यामुळे सत्ताधारी  गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून त्यांनी मतदारांवर दहशत सुरू केली आहे. सर्व मतदारांना बळजबरीने  बंगल्यावर नेऊन त्यांच्यावर दडपण टाकून इच्छा नसताना सहलीला पाठवले जात आहे. खुल्या वातावरणात निवडणूक होऊ न देण्यासाठी हे सर्व कृत्य केले जात आहे.

       नगर तालुक्यातील सर्व मतदार वाड्यावास्त्यांवर राहतात. दूध तसेच शेती व्यवसाय करणारे आहेत. तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मतदारांची इच्छा नसताना त्यांना बळजबरीने घरून नेले जात आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे? सहलीला नेलेल्या उमेदवारांना प्रवासात काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोणाची आहे ? याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...