Skip to main content

लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण.

अहमदनगर:

         मुलीचा घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातूनच अपहरण करण्यात आले आहे.


सदर व्यक्तींनी काय केले बघुया?

      मुलीच्या घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेले गेले आहे. सदर घटना ही दिनांक २१ एप्रिल रोजी घडली असून, या बाबत पोलिस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुलीचे वय १५ वर्षे ९ महिने आहे. त्यामुळे सदर मुलगी ही वय कमी असल्यामुळे अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी तीच्या नातेवाईकांसोबत अहमदनगर मधील नेवासा तालुका, शनी शिंगणापूर रोडवर असलेल्या एका गावात राहते. हा मुलगा अहमदनगर मधील राहुरी तालूक्यातील, ब्राम्हणी येथील आहे. सदर मुलाचे नाव सुनिल सहदेव सुर्यवंशी असे आहे. सुनिलने सन २०२२ मध्ये त्या मुलीच्या घरी देखील गेला होता. सुनिलने मुलीचा घरी जाऊन तीच्या सोबत लग्न करण्यासाठी मागणी देखील घातली होती. 

       मात्र मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी लहान असल्याचे कारण सांगितले होते. त्याला माहित होते आपल्याला लग्नाला नकार दिला आहे. त्यामुळे सुनिल सुर्यवंशी याने वेळोवेळी मुलीचा घरचाना धमकी देखील देली होती.

सुनील काय बोलून धमकावत होता मुलीचा नातेवाईकांना?

        मुलीचा नातेवाईकांना तो सांगत होता, "मुलीचे माझ्या सोबत लग्न लावुन दिले नाहीतर मी तिला पळवुन घेवुन जाईल", अशी धमकी त्यांनी दिली होती. मुलीचा नातेवाईकांना त्याला न जुमानत काही ही केले नाही. परंतु, दि. २० एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी व तीच्या घरातील इतर लोक झोपी गेले होते. मात्र दि. २१ एप्रिल रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. 

          मुलीच्या नातेवाईकांनी तीचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तसेच पिडीत मुलीला लग्नासाठी मागणी घालणारा सुनिल सहदेव सुर्यवंशी हा देखील त्याचे राहते घरी मिळुन न आल्याने त्यांची खात्री झाली की, त्यानेच त्या मुलीला लग्नाचे आमीश दाखवुन फुस लावुन पळवुन नेले आहे, असा पिडीत मुलीच्या नातेवाईकांना संशय आला आहे. 

         सदर मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल सहदेव सुर्यवंशी राहणार ब्राम्हणी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ४२५/२०२३ भादंवि कलम ३६६ प्रमाणे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...