Skip to main content

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये.

      दहिफळ ग्रामस्थांनी उपअभियंता कार्यालयास निवेदन दिले आहे. अन्यथा लाक्षणिक उपोषण केले जाईल असे सांगितले आहे.


         शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश जायभाये, बबलू व्यवहारे व समस्त ग्रामस्थांनी नुकतेच दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहिफळ सबस्टेशन मधून शेतीला वीज पुरवठा मिळणेबाबतचे निवेदन उपअभियंता साहेब म.रा.वि.वि. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या अस्मानी संकट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. तसेच वादळ वारा गारपीट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे शेती व्यवसाय हा फायद्याचा राहिला नसून तो संपूर्ण तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा फायद्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष व सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे परंतु तसे काही परिणाम प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. फक्त शेतकरी नावापुरता शेतकरी राजा शिल्लक राहिला आहे.

          दहिफळ गावासाठी दहिफळ येथे सबस्टेशन करण्यात आले असून त्याचा संपूर्ण फायदा हा दहिफळच्या शेतकऱ्यांना होणे क्रम प्राप्त आहे परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व संतोष निर्माण झालेला आहे. त्या असंतोषाच्या प्रचंड उद्रेक होऊ शकतो तो उद्रेक होऊ नये व शांतता कायम राहावी म्हणून दहिफळ सबस्टेशनमधून संपूर्ण दहीफळ गावच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज प्रवाह मिळावा कारण घोटन सबस्टेशन मधील यंत्रणा खूप जुनी झालेली असून तेथे सतत बिघाड होत असून सतत वीज प्रवाह खंडित होत असतो व परिणामी चांगले आलेले पीक वाया जाऊ खूप मोठी आर्थिक हानी शेतकऱ्यांची होत असते हे सततचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहिफळ स्टेशन मध्ये ॲडिशनल 5 एम.व्ही.ए अजून एक ट्रांसफार्मर बसवण्यात यावा किंवा घोटन सब स्टेशन मधून असणारा दहिफळ गावातील काही भागातील शेतीचा वीज प्रवाह हा बंद करून दहिफळ सब स्टेशन मधून जोडण्यात यावा. या दोन्हीपैकी कोणतीही एक व्यवस्था प्रशासनाने त्यांच्या स्तरावर करावी अन्यथा शेवगाव उपविभागीय कार्यालयासमोर प्रथम एक दिवसाचे लक्षणे व त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यासाठी आंदोलन उपोषण अथवा आत्मदहन करण्याची तयारीही शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे. निवेदनात गोकुळ व्यवहारे, शिंदे राजेंद्र, मुऱ्हाडे बाळू, दत्तू माळी, आसिफभाई पठाण तसेच समस्त ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

       दहिफळ येथील शेतकऱ्यांना घोटण सब स्टेशन येथून वीज पुरवठा होत आलेला आहे परंतु घोटण सबस्टेशन हे अतिशय जुने असल्यामुळे त्या ठिकाणाहून येणाऱ्या वीज प्रवाहात नेहमीच काही ना काही अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून शेवगाव उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक व त्यानंतर आमरण उपोषण करणार आहेत.       - हरीश जायभाये (सामाजिक कार्यकर्ता).....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...