Skip to main content

अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे

अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे.

        अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक नागरिकांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला पळून नेणारा तरुण या दोघांना पकडून पोलिसाच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमन सलीम मोमीन यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सलीम मोमीन हा राहणार मोमिपुरा, तालूका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील आहे. या तरुणाविरुद्ध अपहरण आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


       मागील रविवारी संगमनेर तालुक्यातल्या गंगामाई घाटावर एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. हा प्रकार ‘लव जिहाद’चा असल्याचा संशय नागरिकांना आला होता. लगेच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. विशेष म्हणजे अमन मोमीन या तरुणाने त्या मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सदर मुलीला पटवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे सांगण्यात आले आहे.

     सदर मुलीच्या वडिलांचे इंस्टाग्राम ॲपवर अकाउंट आहे. त्या अकाउंटवर अमन याने त्या मुलीला मेसेज केला आणि संगमनेरच्या बसस्थानकावर बोलवून घेतले. नागरिकांनी या दोघांना पाहिल्यानंतर पोलिसांना या प्रकाराची ताबडतोब कल्पना दिली. पोलिसांनी सदर मुलीच्या आई-वडिलांना बोलवून त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केला गेला.

      आपली मुलगी कुठे जाते, घरी कधी येते, काय करते, मोबाईलवर किती वेळ चॅटिंग करते, कॉलेजच्या नावाखाली किती वेळ घराबाहेर असते, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे‌ असे पोलिस यांचा कडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात ‘लव जिहाद’चे प्रकार वाढत आहेत. अल्पवयीन मुलींना सामाजिक भान नसतं, त्यांच्या भावनेचा गैरवापर करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं. हे प्रकार होऊ नये, यासाठी पालक वर्ग केव्हा अलर्ट होणार, हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या पाल्यावर त्यांचा आई आणि वडील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सदर प्रकार मुलींनी आणि मुलांनी टाळण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या जन्मदात्या आई वडीलांचे समाजामध्ये नाव खराब होते. याचे भान ठेवणे नवीन पिढीने गरजेचे आहे.

   त्यामुळे आपल्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नये असा संदेश यामार्फत घेणे गरजेचे आहे......Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...