Skip to main content

श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत

खा.संजय राऊत यांचे शिंदे सरकारवर खारघर दुर्घटनेमध्ये आरोप.

श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत

मुंबई:

       खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सेवकांचे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, या श्रीसेवकांच्या पोटात जवळपास सात ते आठ तास अन्नपाणी नव्हते. ही बाब अहवालात स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात हे श्रीसेवक पाण्यावाचून तडफडून मेले, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

       राज्य सरकारकडून खारघर दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा लपवला जात आहे. आतापर्यंतच्या अधिकृत माहितीनुसार खारघर दुर्घटनेत उष्माघातामुळे १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, माझ्या माहितीनुसार खारघर दुर्घटनेतील मृतांचा किमान आकडा ५० आणि कमाल आकडा ७५ इतका आहे. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते चार दिवस डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. तेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते ५० श्री सेवकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात श्री सेवकांविषयी सहानुभूती दिसली नाही. खोके सरकारचे लोक मृत श्री सेवकांच्या घरी जाऊन त्यांना पैसे देऊन गप्प बसायला सांगत आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.

श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत

        खारघर दुर्घटनेतील मृत श्रीसेवकांचे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी श्रीसेवकांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

         मृत श्रीसेवकांच्या पोटात सात-आठ तास अन्नपाणी नव्हते रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती.'खोके सरकारचे लोक मृत श्री सेवकांच्या घरी जाऊन त्यांना पैसे देऊन गप्प बसायला सांगत आहेत'.....Read More

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...