अतिशय दुःखद घटना अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी येथील जवानास आले वीरमरण!
अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी येथील जवान रवींद्र बन्सी करांडे यांना सीमेवर असताना वीरमरण आल्याची अतिशय दुःखद घटना घडली आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त रवींद्रजी करांडे हे उत्कृष्ट सायकलपटू देखील होते. त्यांच्या जाण्याने नगर तालुक्यातील व दरेवाडीतील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. अतिशय चांगल्या स्वभावाचे वीर जवान आपल्यातून गेल्याने गावामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांची अंत्य यात्रा दुपारी 3 वाजता दरेवाडी फाट्या पासून लष्करी इंतमात होणार आहे. Read more...

Comments
Post a Comment