Skip to main content

अजित पवारांच्या मनात चालय तरी काय? येत्या चार दिवसांत कळेल; संजय शिरसाट यांचा सूचक इशारा

अजित पवारांच्या मनात चालय तरी काय? येत्या चार दिवसांत कळेल; संजय शिरसाट यांचा सूचक इशारा.

          आज महविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे, या सभेला सर्वच राजकीय आरोप प्रत्यारोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचा चर्चा सुरु आहेत. तर अजित पवार भाजपसोबत त्यांचा काही आमदारांसह जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर निशाणा साधत अजित पवारांबद्दल मोठं सूचक वक्तव्य केले गेले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे, हे येणाऱ्या चार दिवसांत सर्वांना कळेल असं आमदार शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.


आमदार संजय शिरसाठ यांचा या सूचक वक्तव्यामुळे अजित पवार खरचं भाजपसोबत जाणार आहेत का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. 

आमदार संजय शिरसाट काय म्हणाले?

           आज महाविकास आघाडीची होणारी वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना, आमदार संजय शिरसाट म्हणाले, या होणाऱ्या सभेत अजित पवार यांना सर्वात जास्त त्रास झाला असेल. अजित पवार यांना सभेसाठी बोलावले आहे. परंतु त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही माहित नाही. परंतु अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. तसेच वज्रमूठ सभेत अजित पवार हे फक्त शरीराने असतील, मात्र मनापासून सभेत नसणार आहेत. ते मनातून कुठे असतील याबाबत 4 दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल देखील असा सूचक इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला आहे. सध्या अजित पवार हे सगळे विषय हसून खेळून टाळत आहेत. याचाच अर्थ असा होतो की, त्यांच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत आणि ते याबाबत निर्णय घेतील असा सूचक इशारा देत संजय शिरसाठ यांनी वज्रमूठ सभेवर टीका केली आहे.

      आज मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेवरून आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यावेळी ते बोललेली की, यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर अनेक सभा झाल्या. परंतु त्या सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या झाल्या आहेत. परंतु त्या सभांसोबत आज चा होणाऱ्या सभेची बरोबरी करता येणार नाही. परंतु सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस का ठाकरे गटाचा मागे आहे हे कळणे सध्या शक्य नाही.

येत्या १७ सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

       मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी सातत्याने होत आहे, त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक ही छत्रपती संभाजीनगरात व्हायला हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यातूनच मराठवाड्यावरील अन्याय दूर करता येईल. त्यामुळे ही बैठक मराठवाड्यात झाली पाहिजे त्या साठी मी प्रयत्न करत आहे. असे आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.... Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...