Skip to main content

धक्कादायक माहिती महाराष्ट्र दिनीच तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांने गळफास घेत संपवले आयुष्य

धक्कादायक माहिती महाराष्ट्र दिनीच तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांने गळफास घेत संपवले आयुष्य.

रायगड:-

         कामगार दिनी तसेच महाराष्ट्र दिनी एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सदर घटना ही रायगड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या पुढील माहितीनुसार, सदर घटनाही पोलादपूर येथील सरकारी तहसील कार्यालयात घडली आहे. गळफास घेऊन तहसील कार्यालयात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव राजेंद्र केकान असे होते. सदर कर्मचाऱ्यांचे वय हे 30 वर्षे होते. कर्मचारी राजेंद्र केकान हे मूळचे बीड जिल्ह्यातील खोकर मोहा येथील होते. हे सध्या नोकरी निमित्त रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे राहत होते.


        सदर व्यक्तीने पोलादपूर तहसील कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला गळफास लावत आत्महत्या केली आहे. 

तहसील कार्यालयातच आत्महत्या का केली? महाराष्ट्र दिनीच आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

           पोलादपूर परिसरातील पोलिसांनी सदर घटनास्थळी दाखल होत, राजेंद्र कोकण यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टम साठी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. कामगार दिनी तसेच महाराष्ट्र दिनी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 


आत्महत्या मागचे कारण काय असू शकते? तहसील कार्यालयातील कामगारांचे काही प्रश्न होते का? 

         असे अनेक प्रश्न तेथील नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत. तरी सदर आत्महत्याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.......Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...