Skip to main content

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा:-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

        महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली, घटना हे सरकारी हत्याकांड असून, अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला नाही. तरी सदर घटनेला आपल्या सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार दिसत आहेत. या खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिश यांचामार्फत चौकशी केली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे. तसेच बारसु येथील रिफायनरी प्रकल्पसाठी स्थानिकांचा जबरदस्त विरोध असताना, सध्याचे सरकार हे जबरदस्तीने रेटत आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशा सर्व मागण्या राज्यपाल यांच्याकडे केल्या आहेत. 


        महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल श्री. रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली आहे. या सदर शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी आमदार अमर राजूरकर, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

        आस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पुरता पिचलेला असून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आपले महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांना मदत करत नाही, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अजून ही पंचनामे करण्यात आले नाहीत. त्याच प्रमाणे सरकारच्या महसूल व कृषी विभागाकडे पीक पेऱ्याची सर्व माहिती उपलब्ध असते, त्याच्या आधारे सरकारने भरीव अशी शेतकऱ्यांना मदत द्यावी असे ही सांगण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात सिबील स्कोअर ची जाचक अटक असल्याने भरपूर प्रमाणात शेतकरी कर्जापासून वंचित रहात आहेत. शेतकऱ्याला कर्ज मिळू नये, यासाठी केंद्र सरकार श्री. नरेंद्र मोदी यांनी सिबील स्कोअर ची अट महत्वाची केली आहे. तरी ती अट शिथील करण्यात आली पाहिजे.

      तसेच सध्या चालू असलेले रत्नागिरीतील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे, हा सदर विरोध मोडीत काढत, प्रकल्प करण्यासाठी राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करत, स्थानिक नागरिकांवर सरकार अत्याचार करताना दिसत आहे. याठिकाणी हा प्रकल्प करून कोकणाचा निसर्ग सौंदर्य संपवण्याचे काम भाजपा सरकार करताना दिसत आहे. तरी या प्रकल्पाने येथील स्थानिकांचा विकास होणार नाही, तर सरकारच्या बगल बच्च्यांचा विकास होणार आहे असे दिसत आहे. या सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती राज्यपाल यांच्याकडे केली आहे. 

     त्या अधिवेशनात सर्व सामान्य जनतेवर होणारा अन्याय यावर बोलता येईल. आणि होणारा अन्याय थांबवता येईल अशी आशा करतो....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...