Skip to main content

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीत कोसळले; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीत कोसळले; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

           जम्मू-काश्मीर मध्ये किश्तवाडा येथे आपल्या भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सदर हेलिकॉप्टर मध्ये लष्कराचे तीन अधिकारी होते. चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळले असून, तेथे बचाव कार्य लष्कराने सुरू करण्यात आले आहे.

      सदर घटना जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात जीवित हानी झाली नाही. परंतु, चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्या परिसरातील खराब वातावरना मुळे हा अपघात झाल्याचे लष्कराकडून सांगितले गेले आहे.


       ज्या किश्तावाडा परिसरात ह्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झालीय, तो परिसर अत्यंत दुर्गम परिसर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सदर दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. या हेलिकॉप्टरमधून भारतीय लष्कराचे तीन अधिकारी जात होते. हे हेलिकॉप्टर पाऊस आणि खराब हवामानामुळे क्रॅश झाले आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे काय झाले? याची काहीच माहिती सुरुवातीला मिळत नव्हती. या घटनास्थळी रेस्क्यू टीम पाठवली गेली आहे. तरी तेथील स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले आहे असे सांगण्यात आले आहे.

      सदर दुर्घटनेची माहिती भारतीय लष्करानेही दिली गेली आहे. हे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळल्याचे लष्कराने म्हटलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे दोन पायलट आणि एक कमांडिंग अधिकारी होते. या दुर्घटनेतील कमांडिंग अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसे एका पायलटला थोड्या प्रमाणात इजा झाल्याचे सांगितले आहे. त्यांना उपचारासाठी तेथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. परंतु, दुसऱ्या पायलट चा आणखी शोध चालू आहे. हेलिकॉप्टर नदीत कोसळल्याने ते पाण्याचा प्रव्हाने वाहत पुढे गेल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे.

     हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त कशी झाली याची आणखी ठोस माहिती मिळालेली नाही, याबाबत आणखी तपास सुरू आहे. सर्व कडून सांगण्यात आले आहे की, खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असे बोलले जात आहे.            

          जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. तरी हवामान खराब असल्यानेच हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र भारतीय लष्कराकडून या बाबतची आणखी कोणतीही माहिती दिली गेली नाही.

काय आहेत या लष्करी हेलिकॉप्टरची वैशिष्टे?

       हे सैनिकी ALH हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टपरमध्ये एकावेळी 12 सैनिकी जवान बसू शकतात. या हेलिकॉप्टरची लांबी ही 52.1 फूट तर उंची सुमारे 16.4 फूट एवढी आहे. ध्रुव हेलिकॉप्टरचा अधिकतम वेग ताशी 291 की.मी.एवढा आहे. हे हेलिकॉप्टर एकावेळी 630 किलोमीटरपर्यंत उड्डान करू शकते. सैनिकी ALH हेलिकॉप्टर मध्ये प्रगत रडार तसेच इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्स, शक्ती इंजिन, पूर्ण काचेचे कॉकपिट, उच्च-तीव्रतेचा शोध लाईट, प्रगत संप्रेषण प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली तसेच शोध आणि बचाव होमर यांचा समावेश केलेला आहे. साधारण 20 हजार फुटापर्यंत उंचीवर हे हेलिकॉप्टर जाऊ शकते....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...