Skip to main content

बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी भव्य वज्रमूठ सभा

बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी भव्य वज्रमूठ सभा पार पडली.

शिंदे-फडणवीस सरकारला पराभव दिसत असल्यानेच निवडणूका घेत नाही :- नाना पटोले.

मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवीवर भाजपाचा डोळा :- अशोक चव्हाण

मुंबई:- दि. १ मे 

            महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत असताना विरोधकांनी पुन्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व भाजपाचा धुव्वा उडाला व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. मागील तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

        

            मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी विशाल सभा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते ते पुढे म्हणाले की, शेतकरी, मध्यमवर्ग महिला, तरुण हे सर्वजण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. राज्यात अनेक महानगरपालिकांची मुदत संपून दोन दोन वर्ष झाली पण प्रशासक बसवले आहेत. महानगरपालिका जनतेसाठी आहेत पण तिथे निवडणूक घेत नाही. सर्व कारभार प्रशासनाच्या हाती सोपवला आहे. सरकार पराभवाला घाबरत आहे म्हणून निवडणूका घेत नाही. 

           खारघर मध्ये सरकारने हत्याकांड घडवले पण अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही आणि कसलीही कारवाई झालेली नाही. तर बारसूमध्ये जनतेवर अत्याचार करत आहेत. बारसूचा रिफायनरी प्रकल्प हा कोकणच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठी आहे हे उघड झालेले आहे. आज जर सरकारने निवडणुका लावल्या तर त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही.

            यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपा शिंदे सरकारवर सडकून टीका केली. मविआ एकत्र राहून निवडणुका लढल्या तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होतो हे मागील काही निवडणुकांवरून दिसले आहे. विधान परिषद, अंधेरी, कसबा पोटनिवडणुकीत व बाजार समिती निवडणूका जिंकून मविआने हॅटट्रिक केला आहे . आता मुंबईसह इतर महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा लोकसभा निवडणुका जिंकून आपल्याला षटकार मारायचा आहे. जनता आसाराम गयारामांना स्थान देत नाही.

            भाजपाला मंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे ती मुंबईकरांच्या विकासासाठी नाही तर त्यांचा डोळा हा मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या ठेवींवर आहे.

            भाजपा सतत डबल इंजिन सरकार म्हणत आहे. पण डबल इंजिनची गरज कमकुवत असणाऱ्यांना लागते. हे डबल इंजिन भरकटलेले आहे. कर्नाटकात बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. कर्नाटकातील निकाल देशाची दिशा बदलणारे असतील असेही चव्हाण म्हणाले.

            यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, ज्यावेळेला या राज्यातील सरकार कटकारस्थान करुन पाडले त्यावेळी सर्वात आधी सोनियाजी गांधी यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. ज्यांच्याबरोबर शिवसेननेने २५ वर्ष युती केली त्या पक्षाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, हा भाजपाच इतिहास आहे. आम्ही आपल्या बरोबर आहोत व सत्ताधारी पक्षाचा पराभव करु. पंतप्रधान मोदींनी सुद्धा मंबई महापालिकेच्या ठेवीचा उल्लेख करून त्यांचा उद्देश काय आहे हे दाखवून दिले. मविआ कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण त्यात त्यांना यश येणार नाही.

              यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुंबईकर नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.......Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...