Skip to main content

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

        आगामी सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या बळावर विरोधकांना भुईसपाट करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला आहे.
      या शुक्रवार दि. ५ रोजी नगर तालुक्यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तिकरण अभियाना संदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अंतू वारुळे यांच्या सह पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. यावेळी पाथर्डी व नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व विजयी झालेल्या संचालकांचा सत्कार ही करण्यात आला आहे.



          याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे एकजूट दाखविल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना भुईसपाट करण्यात येईल असे सांगितले. तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव अटळ आहे. तसेच विरोधकांचे नाव घेण्या इतपत देखील त्यांची पात्रता राहिलेली नाही. बाजार समितीतील विजय हा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आहे. विरोधकांना महत्त्व न देता तरी आपले पुढील कार्य सुरू ठेवायचे आहे. विरोधक हे ५ वर्ष गप्प बसतात आणि इलेक्शन लागले की जागे होतात. जनतेचे परिवर्तन करण्यासाठी खोटे आरोप करतात. परंतु जनतेला त्यांचा खेळी सर्व माहित झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांवर लक्ष न देता आपले काम चालू ठेवायचे जनता आपोआप न्याय देण्याचा प्रयत्न करते. 
            बुथ रचनेच्या नियोजनात पाथर्डी, नगर व राहुरी तालुका मागे असल्याने वरिष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल तसेच खासदार सुजय विखे यांच्या बद्दल मनात शंका, गैरसमज निर्माण होत आहेत. कोणा एका मुळे पक्ष चालत नाही त्यासाठी सर्वांचे सहकार्य लागते. निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाने जो उपक्रम राबवून दिला आहे. त्याप्रमाणे नियोजन केल्यास सत्याचा विजय निश्चित होतो. बुथ सशक्तिकरण अभियान गांभीर्याने घेऊन प्रत्येक गावात राबविणे गरजेचे आहे. जिल्हा बँक स्थापनेपासून शेतकऱ्यांना लाभ झाला नाही, तो लाभ मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही. बुथ सशक्तीकरण अभियानात सर्वांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक गणात बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
          मी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वापरत नाही. त्यामध्ये गुरफटून न जाता मला लोकांना प्राधान्य देऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. राहुरी बाजार समितीत झालेल्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मी राहुरी, पाथर्डी तालुक्यात वेळ देणार आहे. त्यामुळे आता नगर तालुक्यातील जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज असल्याचे यावेळी शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
      यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सांगितले की, बुथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत सरल व नमो ॲप डाऊनलोड करावी. त्यातील नियोजनानुसार गाव पातळीवर सर्वांनी काम करावे. जिल्हा बँकेच्या तसेच बाजार समितीच्या निवडणुकीनंतर विरोधकांचे तोंड बंद झाले आहे. कर्डिले हे सत्याला नेहमीच न्याय देत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सुजलम, सुफलम घडविण्यासाठी भाजपची एक हाती सत्ता येणे गरजेचे आहे.

तर विधान परिषदेवर असतो.
        नगर, पाथर्डी, राहुरी तालुका बुथ नियोजनात मागे राहिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपली दखल घेत नाहीत. आपले काम जोरात असते तर वरिष्ठांनी दखल घेऊन विधान परिषदेवर आमदार राम शिंदे यांच्या प्रमाणे माझी ही वर्णी विधानपरिषदेवर लागली असती, अशी मिश्किल टिपण्णी शिवाजी कर्डिले यांनी यावेळी केली आहे.

कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’
       शिवाजीराव कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर मतदार संघात ‘गुजरात पॅटर्न’ राबवावा लागेल. गुजरात मध्ये बूथ सशक्तिकरण झाल्याने सहाव्यांदा तेथे भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर गुजरात प्रमाणे आपल्याकडे बूथ सशक्तीकरण अभियान सक्रियपणे राबविण्याची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे......Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...