Skip to main content

नगर तालुक्यातील जेऊर येथे दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे.

नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे

          नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे. समजलेली माहिती अशी आहे की, रहाडगाडग्या मधे बसण्याच्या कारणावरून सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. संध्याकाळी त्याचे पर्यावसन दंगलीमध्ये झाले होते.
(संग्रहित छायाचित्र)



            यात्रेमध्ये आलेल्या भाविकांवर देखील दगडफेक झाली तसेच यात्रेमध्ये असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. जवळपास अर्धा तास १०० ते २०० जणांच्या जमावाकडून ही दगडफेक केली जात होती. त्यामुळे गावामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. या दगड फेकी मध्ये अनेक जन जखमी देखील झाले आहेत. यामधील काहींना नगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
          ग्रामपंचायत कडून दोन्ही क्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते, तरी देखील दगडफेक थांबली नव्हती. यात्रेमध्ये दगडांचा खच साचला गेला होता. पोलिसांनी देखील झालेल्या दंगलीनंतर सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले, असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील सांगण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून जेऊर मध्ये जातीय तणाव वाढलेला दिसून येत आहे. हा तणाव यात्रेमध्ये बाहेर आला आहे. त्यामुळे येथे जमाव बंदी करण्यात आली आहे. सदर घडलेल्या घटनेमुळे बाईचा माता यात्रा उत्सवाला गालबोट लागले आहे.....Read more 


Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...