Skip to main content

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा.

      कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील सर्व आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यासाठी गेले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचे बॅनर आणि फटाक्यांचा अतिशय बाजीत जोरदार असे स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प हा हुकूमशाहीने करणार असेल, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे.


        यावेळी उद्धव ठाकरे बोलले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिले होते ते मला मान्य आहे. त्याबाबत मी तुमची माफी मागतो, परंतु येथील जनतेवर जबरदस्तीने अन्याय करून प्रकल्प करावा असे मी म्हटलो नव्हतो. तसेच हा प्रकल्प सरकारने हुकूमशाहीच्या जोरावर येथील जनतेवर अन्याय होईल अशा प्रकारे हा प्रकल्प लादू नये. जर राज्य सरकारने हुकूमशाहीचा जोरावर हा रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते महाराष्ट्र पेटवून उठवू असा आदेश सरकारला दिला आहे. तरी यावेळी सांगितले की हा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको आहे. त्यामुळे कोकण सौंदर्याचा राज होण्यास भाग पाडेल. तरी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असा अन्याय करता, याबाबत आम्ही शांत राहणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे.

         यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असे स्पष्ट आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. यावेळी ते बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या अगोदर एकनाथ शिंदेंना साधे त्यांच्या जिल्ह्यातील लोकही कोणी ओळखत नव्हती. अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कातळशिल्पांचीही पाहणी केल्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

        शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान, बारसू येथील सड्यावर असलेल्या कातळशिल्पांचीही पाहणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, जसे मी या प्रकल्पाबाबत पत्र दिले होते. तसेच पत्र मी या कातळशिल्पाबाबतही त्यावेळी दिले होते. येथील कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी मी त्यावेळी केली होती. या कातळशिल्पांबाबत मला या अगोदर माहिती होती. परंतु या रिफायनरी प्रकल्प जागेत ही कातळशिल्प येतात हे मला मुळीच माहीत नव्हते. हा महाराष्ट्रातील अमूल्य असा ठेवा आहे. त्याचं जतन केले पाहिजे तरच आपण आपल्या पुढील पिढीला हे दाखवू शकतो.

उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे पुन्हा नव्याने आंदोलन सुरु करणार!

         दरम्यान, बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधातील आंदोलन चार पाच दिवस स्थगित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे येथील ग्रामस्थ पुन्हा नव्याने आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. तरी यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की मी माझ्या कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तो सहन करणार नाही.......Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...