Skip to main content

Posts

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा.       कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील सर्व आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यासाठी गेले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचे बॅनर आणि फटाक्यांचा अतिशय बाजीत जोरदार असे स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. बारसू रि...

Raj Thackeray: जमिनी कोणाला विकू नका! रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांचे कोकणवासीयांना आवाहन

Raj Thackeray: जमिनी कोणाला विकू नका! रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांचे कोकणवासीयांना आवाहन. कोकण:           सर्व कोकणवासीयांना माझे आवाहन आहे की, जमीन घ्यायला कोणी आले, तर आपली जमीन विकू नका. व्यापारी लोकप्रतिनिधींनी सध्या जमिनींचा पार बाजार उठवला आहे. गरीब जनतेकडून कवडीमोल किमतीत जमीन घेतात आणि सरकारकडून त्या जमिनींचा मोठा मोबदला घेतात. त्यामुळे कोकणवासीयांना सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.          राज ठाकरे कोकणवासीयांना म्हणाले, बारसू परिसरातील कातळ शिल्पांची नोंद युनेस्कोत आहे. त्यामुळे बारसू येथे प्रकल्प होऊ शकत नाही. या कातळ शिल्प असलेल्या ठिकाणापासून काही किमी पर्यंतची जागा ही वापरता येत नाही. येथील कातळ शिल्प बघायला जगभरातील लोकं येतात, असे ही ते म्हणाले आहेत. कोकणातील जनतेला नेहमी गृहित धरले जाते. मतदान झाल्यानंतर कोणी विचारत नाही. २००७ चा मुंबई-गोवा महामार्गाला आज १५ वर्षे पूर्ण झाली तरी अजून ही रखडला गेला आहे. परंतु समृद्ध...

अहमदनगर येथे गौतमी पाटील चा कार्यक्रमात झाला जोरदार राडा. पोलिसांना करावा लागला लाठी चार्ज.

अहमदनगर येथे गौतमी पाटील चा कार्यक्रमात झाला जोरदार राडा. पोलिसांना करावा लागला  लाठी चार्ज.          आपल्या नृत्य आणि तमाम महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणार नाव म्हणजे गौतमी पाटील. गावची जत्रा किंवा कोणत्या मोठ्या नेत्याचा बर्थडे असेल तर हमखास घेतल्या जाणाऱ्या नाव म्हणजे गौतमी पाटील. तसेच गौतमी पाटील यांची बैलगाडा मालक प्रेमी म्हणून ही नवी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच तालुक्यात जिल्ह्यामध्ये तिच्या अदांनी तरुणांना घायाळ केला आहे. प्रत्येक लहान मोठ्यांच्या तोंडी आज तिचं नाव आहे. नाव- गौतमी पाटील जन्मस्थान- शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत सध्याचा पत्ता- पुणे व्यवसाय- डान्सर, लावणी राष्ट्रीयत्व- भारतीय धर्म- हिंदू शिक्षण- पदवीधर छंद- संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.         आज गौतमी पाटील चा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चा मध्ये आला आहे.  श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमानिमित्त गौतम पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास तरुणांची तुफान गर्दी झाली होती. सदर कार्यक्रम चालू...

द केरळ स्टोरीला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी रुपये??

'द केरळ स्टोरी' ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी रुपये??           सध्या देशभरात जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'द केरळ स्टोरी' आहे. तसेच वादग्रस्त असलेला चित्रपट ही हाच आहे. परंतु काल संपूर्ण देशभरात हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला देशभरातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.3 करोड रुपये कमावले आहेत. तरी सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे च लागले आहे. सर्व प्रोडूसर्स ला वाटत होते प्रेक्षक चित्रपटावर बहिष्कार टाकतील. परंतु असे काही घडले नाही. मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटांमध्ये कोणाची भूमिका आहे?         'द केरळ स्टोरी' या चित्रपटामध्ये अदा शर्मा, सोनिया बालानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांच्या मुख्यतः प्रमुख भूमिका आहेत. तसेच बाकी इतर बॅकअप आर्टिस्ट खूप आहेत. 'द केरळ स्टोरी' कशी घडली?          'द केरळ स्टोरी' हा चित्रपट...

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.         आगामी सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या बळावर विरोधकांना भुईसपाट करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला आहे.       या शुक्रवार दि. ५ रोजी नगर तालुक्यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तिकरण अभियाना संदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अंतू वारुळे यांच्या सह पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. यावेळी पाथर्डी व नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व विजयी झालेल्या संचालकांचा सत्कार ही करण्यात आला आहे.           याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे एकजूट दाखविल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना भुईसपाट करण्यात येईल असे सांगितले. तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरे...

शरद पवारांची मोठी घोषणा, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

शरद पवारांची मोठी घोषणा, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे            माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.         शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्त राजीनामाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तरी या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी यावेळी सांगितले आहे की, नव्या नेतृत्वासाठी संघटनात्मक बदल करणार आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा, असे ते यावेळी बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामाचा निर्णय मागे घेतो, परंतु कोणते ही जबाबदारी चे पद मी घेणार नाही असेही ते यावेळी बोलले आहेत.         ...