Skip to main content

Posts

नाशिकसाठी खुशखबर मेट्रो प्रकल्पाबाबत मोठे अपडेट

 नाशिकसाठी खुशखबर मेट्रो प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च. नाशिक नवीन मेट्रो प्रकल्प:       नाशिकरांचा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे मेट्रो मार्ग प्रकल्प आहे. नाशिकचा या मेट्रो मार्ग प्रकल्पाची घोषणा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गेली आहे. नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली गेली होती. नाशिक शहर पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओची घोषणा झाली म्हणून नाशिककरांना मेट्रोचा अनुभव घेता येईल असा आशावाद व्यक्त होत होता.          विशेष म्हणजे 2020 मध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील केली होती. यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा 2020 मध्ये व्यक्त होत होती. परंतु आता 2023 संपत चालला तरी या निओ मेट्रोमार्ग प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही.         यामुळे या प्रकल्पाबाबत नाशिककरांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र...

अहमदनगर मधील मतदारांना दहशतीने सहलीला पाठवल्याची 'मविआ'ची तक्रार

अहमदनगर मधील मतदारांना दहशतीने सहलीला पाठवल्याची 'मविआ'ची तक्रार. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती लोकसत्ता प्रतिनिधी. अहमदनगर :       नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार  हे मतदारांवर दहशत निर्माण करून बळजबरीने बुऱ्हाणनगर येथे बोलवून घेवुन, दमदाटी करून मतदारांना सहलीवर पाठवत आहेत. बळजबरीने सहलीला पाठवलेल्या मतदार व त्यांच्या कुटुंबाला काही झाल्यास त्यास जबाबदार राहतील, असे निवेदन नगर तालुका महाविकास आघाडीचा कार्कर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.        या दिलेल्या निवेदनावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संदेश कार्ले, शरद ढगे, संगीता ठोंबरे, राजेंद्र भगत, संदीप कर्डिले, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, महेंद्र शेळके, रामेश्वर सोलट यांच्या सह्या आहेत.       सदर निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्ट कारभार महाविकास आघाडीने वेळोवेळी उघड केला आहे. अनधिकृत गाळे विक्रीतून सत्ताधाऱ्यांनी मोठा निधी कमावला तसेच बाजार समितीच्या वार्षिक...

ब्रेकिंग न्यूज नगर शहरामध्ये पुन्हा एकदा तरुणावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज: अहमदनगर शहरामध्ये पुन्हा एकदा तरुणावर हल्ला.     अहमदनगर शहरामध्ये सध्या वारंवार भांडणे होत आहेत. त्यातच पुन्हा एकदा तरुणावर हल्ला झाला आहे. पहिले वाद मिटतात नाही तो पर्यंत दुसरे वाद समोर येतात. यावर प्रशासनाने कडक कारवाईचे आदेश देऊन देखील नगर शहरामध्ये वाद घडणे थांबले नाहीत. हे सर्व वाद कशामुळे घडतात?         मागील काही दिवसांपासून नगर शहरांमध्ये  जातीय तणाव वाढला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी अहमनगर बाजार पेठेतली घटना असेल, रामवाडी येथील घटना असेल, शहर जवळील गजराज नगर येथील घटना असेल. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आता आणखी एका तरुणावर नगरमध्ये काल रात्री हल्ला झाला. नगर शहरामध्ये नवीन वाद कुठे झाला?          समजलेल्या माहितीनुसार काल रात्री दोन जणांमध्ये माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा येथे वाद झाला. नंतर या वादाचे पडसाद नगर शहरात पाहायला मिळाले. तसेच एका वाहनाचे देखील तोडफोड करण्यात आली. सदर ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा तातडीने दाखल झाला. त्यामुळे नगर परिसरातील तणाव निवळला गेला आहे. सदर ठिकाणी अहमदनगरचे पीआय...

महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेस सुरुवात

महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेस सुरुवात.        आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेस प्रारंभ झाला आहे.      राज्यस्तरीय परिषदेत आजचे महत्वाचा मुद्यांवर विचार विनिमय झाले. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी येत्या जूनपासून ई - पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.                     पुढील काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई -पंचनामा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी, याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे....

पाथर्डी आगारातील एसटीचा अपघात प्रवाशांना किरकोळ स्वरूपात दुखापत

पाथर्डी आगारातील एसटीचा अपघात प्रवाशांना किरकोळ स्वरूपात दुखापत. अहमदनगर:-         पाथर्डी वरून पावणे चार ची एसटी कोल्हार उदरमल पांढरीचा पूल मार्गे अहमदनगर जाणारी गाडी आत्ता पाच वाजता उदरमल शिवारामध्ये रोडच्या साईटला नाली मध्ये घसरल्यामुळे प्रवाशांना किरकोळ स्वरूपात दुखापत झालेली आहे.          तरी ही बस नगर वरून मुक्कामी श्री शेत्र तारकेश्वर गड या ठिकाणी संध्याकाळी मुक्कामाला जात असती. तरी आज रोजी ही बस संध्याकाळी मुक्कामाला गडावर जाणार नाही, याची पुढील प्रवाशांनी नोंद घ्यावी .....Read more

दिल्लीत धडकणार महाराष्ट्र भवनातील अधिवेशनाचे उद्या उद्घाटन

दिल्लीत धडकणार महाराष्ट्र भवनातील अधिवेशनाचे उद्या उद्घाटन....         सभापती दिव्या पाटील यांची माहिती सकाळ माध्यम समूहाच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'चे (यिन) वादळ आता दिल्लीत धडकणार आहे. प्रथमच केंद्रीय अधिवेशन थेट देशाच्या राजधानीत मंगळवारी (ता. २५) आणि बुधवारी (ता. २६) आयोजित करण्यात येत आहे.       'यिन'च्या १० समित्यांचे राज्यभरातील प्रतिनिधी दिल्ली येथील केंद्रीय अधिवेशनात सहभागी होत आहेत. मंगळवारी प्रतिरूप सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते पार पडेल. या वेळी केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या पाटील अहवालाचे वाचन करतील. तर पहिल्या दिवसाच्या अधिवेशनात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर आणि युवा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कसेनेचे राज्य सचिव किरण साळी मार्गदर्शन करणार आहेत. बुधवारी (ता. २६) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुथ...

अहमदनगर जिल्ह्यात शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जा क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

अहमदनगर करांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा! अहमदनगर:-         अहमदनगर जिल्ह्यात शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जा क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा देवेंद्र फडणीस यांनी केली आहे. नुकताच पार पडलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर येथे आले असता त्यांनी ही घोषणा केली आहे .                पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रस्ताव देवेंद्र फडणीस यांना दिला आहे त्याला लवकर शासन मान्यता मिळेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे.        अहमदनगर जिल्ह्यातील आगळीवेगळी परंपरा सुरू केली आहे छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती विजेत्यांना चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली होती.पण आता अहमदनगर मध्ये सोन्याची गदा देण्याच्या परंपरेला सुरुवात झाली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे या कधीची किंमत सुमारे 35 लाख रुपये होती या गदेचे पहिले विजेते सोलापूरचे पैलवान महेंद्र गायकवाड हे आहे ....Read more