Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा.           बोल्हेगाव मधील साळवे नगर, नवनाथ नगर अंतर्गत रोड चे कॉक्रेटीकरण तसेच गटार लाईन काम पूर्ण करण्यात आले. या कामाचा आज लोकार्पण सोहळा होता. हा सोहळा आमदार संग्राम जगताप यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व गावकऱ्यांनी फटाक्यांचा अतिशय बाजित नगरसेवक कुमारसिंह वाकळे आणि आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले आहे. तसेच सर्व गावकऱ्यांनी "कुमार भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " आणि "राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो" या घोषणा देत गावकऱ्यांनी आनंद यावेळी व्यक्त केला. नगरसेवक वाकळे यांनी प्रभागातील बारकाईने अभ्यास करून विकास कामे मार्गी लावले. महापालिकेत त्यांना स्थायी सभापती पदाची संधी मिळाल्याने त्यांनी या भागातील चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे.           विकासाचे व्हिजन असलेल्या नगरसेवकांकडून प्रभागातील कामे मार्गी लावण्यात येतात. याच कामाचे मूल्यमापन करून...

ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक घुगे भालचंद्र यांनी ५५ व्यावर्षी LLB पदवी प्राप्त केली

ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक घुगे भालचंद्र यांनी ५५ व्यावर्षी LLB पदवी प्राप्त केली. ठाणे:- प्रतिनिधी          सध्याचे ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक घुगे भालचंद्र यांनी ५५ व्यावर्षी LLB पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा वडिलांचे नाव एकनाथ घुगे व आईचे नाव सुशीला घुगे आहे. घुगे भालचंद्र यांची आई नाशिक जिल्हा सिन्नर तालुका मधील वडगाव पिंगळे येथील आहे. तर वडील हे मनमाड येथील आहेत. त्यांचे वडील नोकरी निमित्त भुसावळ येथे रेल्वे मध्ये असल्यामुळे तेथे स्थायिक झाले आहेत. तसेच त्यांचा जन्म हा भुसावळ येथे झाला आहे.  घुगे भालचंद्र यांचा शिक्षण आणि नोकरीचा जीवन प्रवास कसा सुरू झाला?          त्यांचे १० वी पर्यंत चे शिक्षण हे सेंट अलोयसियस हायस्कुल जळगाव जिल्हा मधील नामांकित शाळेमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी काळाचौकी मुंबई येथे मामांकडे राहून परेल येथील आर. एम. भट महाविद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले, नंतर त्यांनी जळगाव येथील एम. जे. महाविद्यालय मधून B. Com. पदवी प्राप्त झाल्यानंतर MPSC- PSI परीक्षा दिली, परंतु शरीराने काटकुळ असल्याम...

आठवड्या बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक

आठवड्या बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक... बीड:-         मराठवाड्यातील बीडच्या बाजार समितीमध्ये धनंजय गुंदेकर यांचा झालेला विजय थोडा अनोखा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शालेय जीवनापासूनच त्याच्यात लोकचळवळीचे गुण होते. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्याने पत्रकारिता केली, शिक्षण पूर्ण केल्यावर तो काही राजकीय व्यक्तींकडे पी. ए. म्हणूनही त्याने काही काळ काम केले. त्यामुळे सामान्य जनते मध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली होती. तसेच सामान्य जनतेचे प्रश्न ही चांगल्या प्रकारे सोडवत होता. हे सगळं करताना त्याला त्याच्यातील धडपडणारा कार्यकर्ता स्वस्थ बसू देत नव्हता.         २०१७ ला आंबेसावळी ग्रामपंचायतीत धनंजयने त्याचे पॅनल उभे केले. ते दणकून आपटले. त्या दिवसापासून तर त्याने शासकीय अन्यायाने पिचलेल्या जनमाणसांसाठी स्वतःला झोकून दिले. बीड तालुक्यात शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. अभ्यासू वृत्तीने स्वतःची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. छोटेसे का होईना पण सामान्यांसा...

पै. सौरभ मराठे ने दौला वडगाव केसरी मानाची चांदीची गदा पटकावली

पै. सौरभ मराठे ने दौला वडगाव केसरी मानाची चांदीची गदा पटकावली.          दौला वडगाव, 28 एप्रिल 2023. दौला वडगाव केसरी किताबाचे मानकरी मराठवाडी चे पैलवान सौरभ मराठे हे ठरले आहेत. नगर तालुक्यातील दौला वडगाव येथील सुप्रसिद्ध कुस्ती आखाड्याची मानाची २०२३ ची गदा मराठवाडी येथील बुर्हानगर तालमीतील पैलवान सौरभ मराठे यांनी जिंकली आहे.              दर वर्षी प्रमाणे दौला वडगाव ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटीने यावर्षी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी गावकऱ्यांनी प्रथम विजेत्यास रोख स्वरूपात रक्कम न देता चांदीची गदा बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील सर्व नामांकित पैलवान या ठिकाणी चांदीची गदा पटकवण्यासाठी आले होते. तसेच मागील वर्षा पेक्षा या वर्षी आनंदात अशी यात्रा साजरी करण्यात आली. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोषणा देत, पैलवान सौरभ मराठे यांची मिरवणूक ही काढण्यात आली होती. ही मानाची कुस्ती शेवटची होती. या मध्ये दौला वडगाव मानाची कुस्ती म्हणून शेवटची कुस्ती ठेवण्यात आली होती.      ...

बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे ठरले किंग मेकर

बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे ठरले किंग मेकर... बीड :           बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावात किंग कोण हे झालं स्पष्ट; परळी पाठोपाठ अंबाजोगाईत ही सत्ता राष्ट्रवादीकडे गेली आहे.        बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, पाटोदा-शिरुर, कडा, बीड या 9 बाजार समितींची प्रत्येकी 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी परळी येथील बाजार समिती ही महत्वाची ठरली आहे.         महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला ओळखले जाते. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग हा या निवडणुकीतून केला जातो. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावत असतात. यावरच पुढील जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकीचे गणितं मांडली जात आहेत. बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मुंडे बहीण भाऊ गटातच चुरशी बघायला मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, पाटोदा-शिरुर, कडा, बीड या 9 बाजार समितींची...

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेच ठरले पुन्हा एकदा किंग मेकर...

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेच ठरले पुन्हा एकदा किंग मेकर... अहमदनगर:-                 नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सलग चौथ्यांदा विजय मिळवत बाजार समितीची सत्ता कायम राखली.             १८ पैकी १८ जागांवर कर्डिले कोतकर गटाने विजय मिळवला असून त्यांच्या मागील निवडणुकीचा मता पेक्षा यावेळी मताधिक्यात वाढ झालेली दिसत आहे. त्यापैकी दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या,  तिथेही कर्डिले गटाने त्यातून दोन जागा बिनविरोध जिंकले होते. कर्डिले कोतकर गटा विरोधात महाविकास आघाडी कडून संदेश कारले व रोहिदास कर्डिले आघाडीवर होते. या दोन उमेदवारांनी देखील चांगली लढत दिली, मात्र तरी ही या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला.              हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी य...

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते पोटे यांना धमकी

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते पोटे यांना धमकी…. अहमदनगर शहर ब्रेकिंग न्यूज:-          अहमदनगर शहर सामाजिक कार्यकर्ते पोटे यांना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडून धमकी देण्यात आली आहे. सदर घटना दि. २८ एप्रिल २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी घडली आहे.            निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश पोटे याच्या सह काही सहकाऱ्यांसमवेत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद शाळा, गुलमोहर रोड, अहमदनगर या ठिकाणी गेले होते. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते पोटे यांना समोरील विरोधी पक्षाचे भाजपचे उमेदवार हे मतदारांना खाजगी ट्रॅव्हल मधून निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत सदरच्या खाजगी ट्रॅव्हल्स मधून आलेल्या मतदारांना घेऊन १०० मीटर एरियाच्या आत नेताना दिसले. त्यावेळी पोटे यांनी व इतर कार्यकर्त्यांसह सदर खाजगी बस ट्रॅव्हलला विरोध करत संविधानिक रित्या सदर गाडीच्या समोर मांडी घालून बसले होते.          या गोष्टीचा राग मनात धरून सामाजिक कार्य...

युवा सेनेच्या विस्तारक शर्मिला येवले यांचा कडून पुणे म्हाडा मंडळ आणि कंत्राटदार यांचा समोर आत्मदहन करण्याचा इशारा.

युवा सेनेच्या विस्तारक शर्मिला येवले यांचा कडून पुणे म्हाडा मंडळ आणि कंत्राटदार यांचा समोर आत्मदहन करण्याचा इशारा. गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे:-         म्हाडाकडून आणि कंत्राट दिलेल्या कंपनीकडून वारंवार २०२३ ची सोडत कशी पारदर्शक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे. परंतु वास्तविक पाहता असे काहीही दिसत नाही.            २० मार्च २०२३ रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत जाहीर करण्यात आली होती. पण या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रारिक त्रुटी होत्या हे वारंवार पुणे मंडळ आणि कंपनीच्या लक्षात आणून देऊन सुद्धा यावर काम न करता नागरिकांची फसवणूक केली गेली आहे आणि या पुढेही आणखी फसवणूक करण्याचे काम चालूच आहे. यावेळी त्यांनी म्हाडासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न हा उपस्थित केला आहे. आधीच सॉफ्टवेअर असताना नवीन सॉफ्टवेअरचा घाट कशासाठी, जर आधीच सॉफ्टवेअर योग्य होते, तर त्यात सुधारणा करून देखील लॉटरी काढता आली असती. परंतु म्हाडा पुणे मंडळाकडे पैसे जास्त झाल्यामुळे त्यांनी नवीन कंपनीला कंत्राट देत पारदर्...

सरपंचाला पगार किती आहे? सरपंचाची कामे कोणती आहेत? त्याबाबत तक्रार कुठे करायची?

सरपंचाला पगार किती आहे? सरपंचाची कामे कोणती आहेत? त्याबाबत तक्रार कुठे करायची?     सरपंच हा ग्रामपंचायतीचा मुख्य सदस्य असतो. महाराष्ट्र सरकारकडून सर्व सरपंचांना दरमहा 3000 रुपये वेतन स्वरूपात पगार दिला जातो. आणि सरपंचाचा कार्यकाळ हा ५ वर्षासाठी असतो.        आपण जाणून घेऊ या सरपंचाचा पगार किती असतो, सरपंच कसा कमावतो, सरपंच कसा काढायचा, सरपंचाचा कार्यकाळ किती दिवसाचा आहे, सरपंचाला प्रत्येक महिन्याचा पगार किती येतो, सरपंचाची कोणती कामे आहेत आणि कामाची यादी, सरपंच सर्व तक्रार क्रमांक आणि सरपंच यांच्याशी संबंधित माहितीचे प्रकार आपण पाहणार आहोत. सरपंचाला पगार किती असतो?       प्रत्येक गावातील सरपंच हा ग्रामपंचायतींची काळजी घेतात, त्यासाठी सरपंचाला 100 रुपये मानधन म्हणून दिले जाते, तसेच सरपंचाला 100 रुपये भत्ता म्हणून दिला जातो. म्हणजेच सरपंचाला दरमहा सरकारकडून 3000 ते 3500 रुपये मिळतात. परंतु एकदा ग्रामपंचायतीत सरपंच निवडून आल्यावर एखादी व्यक्ती केवळ ५ वर्षे सरपंच पदावर राहू शकते. कारण सरपंचाची मुदत ही फक्त ५ वर्षेच आहे. यानंतर सरपंच की पगारा व्यति...

वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील २ री घटना वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू. अहमदनगर :-        अहमदनगर मधील नेवासा तालुक्यातील २ री घटना मागील ४ दिवसा पूर्वी वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नेवासा येथील म्हसले गावामध्ये घडली आहे.          सदर घटना २८ एप्रिल २०२३ रोजी १२:१५ मिनिटाचा सुमारास घडली आहे. मुलाचे नाव साई ऊर्फ बहिरूनाथ राजेंद्र शिरसाठ असे आहे. सदर मुलाचे वय हे १० वर्ष असून तो इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता.          शुक्रवारी सकाळी ११:३० ते १२:३० या दरम्यान वादळी वाऱ्यासह, विजेचा कडकडाटसह अवकाळी पाऊस झाला आहे. हा मुलगा शेतकऱ्याचा असून शेतात कांदे काढून ठेवलेले होते, ते झाकण्यासाठी त्याचा कुटुंबासोबत शेतात गेला होता. त्याचा सोबत यावेळी त्याचे आई आणि वडील सोबत होते. कांदे झाकत असतानाच वीज कडाडली आणि त्यानंतर २० सेकंदात ती खाली कोसळली गेली. आणि त्यामध्ये त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावेळी विजेचा शॉक बसून आणि आवाज एकून संपूर्ण जमीन हादरून गेली होती, अ...

१८ लाखांचा घोळ केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

 १८ लाखांचा घोळ केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल.   अहमदनगर :-              अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील दिघी गावातील ग्रामपंचायतमध्ये 14 व्या वित्त आयोगाचे निधी मध्ये तब्बल 18 लाख 33 हजार 500 रुपयांचा घोळ केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवका विरुद्ध नेवासा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               ग्रामपंचायत मध्ये 14 वा वित्त आयोग अंतर्गत शासनाकडून जमा झालेल्या निधीचं अयोग्य वापर केल्या कारणाने सदर ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात चौकशी करण्यात येत आहे.          या बाबत नेवासा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवनाथ देवराय पाखरे (वय 55) रा.नेवासा फाटा यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, २० डिसेंबर २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांनी मौजे दिघी ता. नेवासा येथील १४ वा वित्त आयोग निधीमधील पैशाची चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये उपलब्ध लेख्यांची तपासणी, पाहणी करुन अपहारीत रक्कम रुपये १८ लाख ३३ हजार ५०० बाबतचा चौकशी अहवाल सादर केला गेल...

अहमदनगरची महिला भाग्यश्री महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेती २०२३

अहमदनगरची महिला भाग्यश्री महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेती २०२३         कोल्हापुरमध्ये झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही कुस्ती स्पर्धा झाली आहे. या कुस्ती स्पर्धा मध्ये कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले आहे. दीपाली भोसले-सय्यद यांनी सरकारकडून क्लास वन नोकरीची मागणी:       त्यामागील फेरीत भाग्यश्री विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात देखील चांगलीच लढत झाली होती. पहिली फेरी ही अमृताची लढत कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पाशी झाली होती. ही लढत अमृताने जिंकली होती.               यावेळी विजेत्या भाग्यश्रीला पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भाग्यश्रीला चांदीची गदा व चारचाकीची चावी सुपूर्द करण्यात आली होती. तर त्यावेळी प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवाना...

महिला पोलीस अधिकारी मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ

😱महिला पोलीस अधिकारी मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ.         महिला पोलीस अधिकारी मृत अवस्थेत राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे कुर्ल्यातील कामगार नगरच्या शरद सोसायटीमध्ये ही महिला पोलीस अधिकारी वास्तव्यास होती.         शितल एडके असे मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. सदर पोलीस अधिकारी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याकारणाने शेजारील राहणाऱ्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शितल एडके या मृत अवस्थेत आढळल्या.           त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची प्राथमिक माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवस आधीच झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कुर्ल्यातील नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कार...

शिवरायांचा पुतळा आता सातासमुद्रा पार ! देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी रवाना.

शिवरायांचा पुतळा आता सातासमुद्रा पार ! देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी रवाना.         मॉरिशसचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, काही सामंजस्य करार सुद्धा होणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाणार आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सातासमुद्रापार लोकार्पण सोहळा होणार आहे.            अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा आता सात समुद्र पार उभारण्यात येत आहे. शिवरायांनी केलेले महान कार्य जगामध्ये पोहोचावे यासाठी अनेक शिवभक्त प्रयत्न करत आहेत. तसेच सरकार देखील असे प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये युनिव्हर्सिटी मध्ये शिकवले जात आहे. ज्यांच्या जीवनातून समाजातील प्रत्येक घटकाला शिकण्यासारखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. युगपुरुषाचा पुतळा सातसमुद्रा पार उभारण्यात येत असून हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाच...

विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे

विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पत्रात काय लिहले आहे?        आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत अशी मागणी केली गेली आहे.      आपले राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र दिनीच ही घोषणा करावी, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करतो. केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी आपल्या महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी असे सांगितले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा:     आपल्या सर्वांचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्राकडून केंद्र सरकारकडे गेली १० वर्षे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाषा,...

माजी खासदार राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप

 माजी खासदार राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप !        महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असा वक्तव्य त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. शासकीय बदल्या साठी राजकारणी लोक नोकरदार व्यक्तींनकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. जो घेतो तो सांगत नाही, पण जर देतो तो अनेक ठिकाणी सांगतो.           सरकारी अधिकारी आणि तो सांगतो मी काय फुकट आलो नाही, मी एवढे एवढे पैसे देऊन आलो आहे. मला कोणी काही विचारू शकत नाही. जे विचारू शकतात त्यांनाच आम्ही पैसे दिले आहेत. कोणीच काही वाकड करू शकत नाही. अशी निर्लज्ज भूमिका हे सर्व लोक मिळून करत आहेत. हा त्रास सामान्य माणसांना होतो आहे. आज तहसीलदार ऑफिसला तसं नोंदीसाठी कमीत कमी पाच हजार रुपये द्यावे लागतात. तसेच तलाठी पाचशे रुपये घेत आहेत. त्यानंतर तलाठी कडून पुढे सर्कलला जावं लागते. त्यांनाही मागेल तेवढे पैसे द्यावे लागते. कारण आपले काम अडकून ठेवतात.             हे लोक त्यामुळे सामान्य जनता ही देखील विचार करत नाहीत. महाराष्ट्रात पोलीस गाडी अडवतात तिथेही पैसे माग...

लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण. अहमदनगर :          मुलीचा घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातूनच अपहरण करण्यात आले आहे. सदर व्यक्तींनी काय केले बघुया?       मुलीच्या घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेले गेले आहे. सदर घटना ही दिनांक २१ एप्रिल रोजी घडली असून, या बाबत पोलिस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुलीचे वय १५ वर्षे ९ महिने आहे. त्यामुळे सदर मुलगी ही वय कमी असल्यामुळे अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी तीच्या नातेवाईकांसोबत अहमदनगर मधील नेवासा तालुका, शनी शिंगणापूर रोडवर असलेल्या एका गावात राहते. हा मुलगा अहमदनगर मधील राहुरी तालूक्यातील, ब्राम्हणी येथील आहे. सदर मुलाचे नाव सुनिल सहदेव सुर्यवंशी असे आहे. सुनिलने सन २०२२ मध्ये त्या मुलीच्या घरी देखील गेला होता. सुनिलने मुलीचा घरी जाऊन तीच्या सोबत लग्न करण्यासाठी मागणी देखील घातली होती.  ...

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू झाला

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू.   अहमदनगर :           आज अहमदनगर नेवासा तालुक्यातील जेऊर रोड तांबे वस्ती शिवरात कांदे काढण्यासाठी गेलेले असताना. अचानक अवकाळी संकट आल्याने अचानक पाऊस, वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला. तेवढ्यात कांदे काढणाऱ्या महिला पळापळी करू लागल्या. तेवढ्यात अचानक सविता राजू बर्फे या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा आकस्मित जागीच मृत्यू झाला. महिलेचे वय 42 होते तर तिच्या मागे पती, मुलगा, मुलगी, भाऊ, आई असा मोठा परीवार आहे.        यावेळी गावात खबर पसरताच गावातली लोकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली .यावेळी नेवासा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाना पोलीस नाईक तुकाराम खेडकर, पोलिस नाईक तांबे, बबलू चव्हाण यांनी स्पॉट पाहणी केली. व जागेवरील पंचनामा करून मृतदेह नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला आहे. तरी सरकारने या घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेला व्हिडिओ पहा. अशे जर वादळ असेल तर शेतकरी शेत...

काळजाला चटका लावणारी एक्झिट शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू दादा तुकाराम चव्हाण

काळजाला चटका लावणारी एक्झिट शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू दादा तुकाराम चव्हाण यांचे कोपरगाव येथे हृदयाच्या त्रीव्र झटक्याने निधन.         मूळचे पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील असलेले पूर्वी शेवगांव येथे दीर्घकाळ शेवगांव पोलीस स्टेशन चे माजी गुप्तवार्ता अधिकारी कर्तव्यदक्ष पोलीस कै. श्री. राजू तुकाराम चव्हाण वय 51 यांचे आज कोपरगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असताना. आज बुधवार २६ एप्रिल सायंकाळी ०९: ०० वाजेच्या सुमारास कोपरगाव येथे हृदयाच्या त्रीव्र झटक्याने निधन झालेे आहे.          शेवगांव पोलीस स्टेशन ला त्यांनी गुप्तवार्ता विभागात अतिशय चोख कामं अनेक वर्षे समर्थपणे सांभाळलेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिरिस्थित त्यांनी आपल्या छोट्याश्या घुमटवाडी यां खेड्यातून आपले शिक्षण पुर्ण करून कसोटीने पोलीस दलातील नोकरी केली आहे. त्यांचा अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर आणि शेवगांव शहरातील त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेे. त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुलं बंधु असा मोठा...

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये.       दहिफळ ग्रामस्थांनी उपअभियंता कार्यालयास निवेदन दिले आहे. अन्यथा लाक्षणिक उपोषण केले जाईल असे सांगितले आहे.          शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश जायभाये, बबलू व्यवहारे व समस्त ग्रामस्थांनी नुकतेच दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहिफळ सबस्टेशन मधून शेतीला वीज पुरवठा मिळणेबाबतचे निवेदन उपअभियंता साहेब म.रा.वि.वि. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या अस्मानी संकट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. तसेच वादळ वारा गारपीट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे शेती व्यवसाय हा फायद्याचा राहिला नसून तो संपूर्ण तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा फायद्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष व सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे परंतु तसे काही परिणाम प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. फक्त शेतकरी नावापुरता शेतकरी राजा शिल्लक राहिला आहे.           दहिफळ गावासाठी दहिफळ...

अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे

अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे.         अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक नागरिकांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला पळून नेणारा तरुण या दोघांना पकडून पोलिसाच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमन सलीम मोमीन यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सलीम मोमीन हा राहणार मोमिपुरा, तालूका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील आहे. या तरुणाविरुद्ध अपहरण आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        मागील रविवारी संगमनेर तालुक्यातल्या गंगामाई घाटावर एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. हा प्रकार ‘लव जिहाद’चा असल्याचा संशय नागरिकांना आला होता. लगेच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. विशेष म्हणजे अमन मोमीन या तरुणाने त्या मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सदर मुलीला पटवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे सांगण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च? भाजपच्या दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण तापले.

 मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च? भाजपच्या दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण तापले. दिल्ली :         आपल्या देशातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च करण्यात आल्याचा भाजपचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च?      भाजपच्या कार्यकर्त्यांनचा या कथित दाव्यांनंतर दिल्लीचं राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभीकरणावर 45 कोटींचा खर्च खरचं झाला आहे का या प्रश्नावर चर्चा रंगल्या आहेत. हा भाजपचा कथित दावा खरा आहे का त्यामुळे राजकारण पेटलं गेले आहे.    भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे साथीदार राजकारणात आले आहेत. पक्षाच्या नावातही 'आम आदमी पक्ष' असे देण्यात आले आहे. परंतू मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर स्वत: च्या शासकीय निवासस्थानी सुशोभीकरणासाठी कोटीच्या कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यावरुन दिल...

चक्क मुकेश अंबानी यांनी दिले मोदींना १५०० कोटींचे घर गिफ्ट केले आहे.

चक्क मुकेश अंबानी यांनी दिले मोदींना १५०० कोटींचे घर गिफ्ट केले आहे.           सध्या अनेक उद्योगपती आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतात. या अगोदर देखील अनेक उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल अनेक गोष्टी भेट स्वरूपात दिल्या आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. त्यांचं नाव आहे  मोदी. हे दुसरे तिसरे कोनी मोदी नसून मनोज मोदी आहेत. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनी मध्ये कार्यरत आहेत.      उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर भेट दिले आहे. कर्मचाऱ्याच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोण आहे तो कर्मचारी ज्याच्यावर अंबानींची कृपा झाली आहे.       मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे विश्वासू कर्मचारी आहेत, त्यांच्याशिवाय मुकेश अंबानींचे पानही हलत नाही. मुकेश अंबानींच्या जळच्या व्यक्तींमध्ये मनोज मोदींचे नाव आवर्जून घेतले जाते. तर मनोज मोदी हे शालेय जीवनापासून मुकेश अंबानींचे वर्गमित्र असल्याचेही म्हटले जाते. दोघांनी...

महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन

महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन. रत्नागिरी:-       महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन चालत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक हे आंदोलन नसताना भेटीसाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांचा ताफा अडवला. पोलीस प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यासाठी रोखले. त्यानंतर काही वेळ नाही खासदार विनायक राऊत व वैभव नाईक यांना त्यांच्या पाच ते सहा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. आंदोलक भयंकर भडकले आहेत. हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे अशा व्यथा त्यांनी आणल्या आहेत.       या प्रकल्पामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांमध्ये आरोप करत आहेत शिंदे सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही जागा सुचवली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.असे आरोप उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे प...

आनंदाचा शिधा वाटप आणि आता मुलांच्या पोषण आहारातही उंदीर सापडला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उंदरांचा सुळसुळाट... छत्रपती संभाजीनगर:     आनंदाचा शिधा वाटप आणि आता मुलांच्या पोषण आहारातही उंदीर सापडला आहे.        सध्याचा गतिमान सरकारच्या कामगिरीमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे हवालदिल झाली आहे असे दिसत आहे. आपल्या सरकारचा निष्काळजी कारभारामुळे सरकार लोकांच्या जीवाशी सातत्याने खेळ करत आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या पोषण आहारासाठी आणलेल्या धान्यात भलामोठा सडलेला उंदीर निघाला आहे. असा निकृष्ट दर्जाचा आहार देऊन लहानग्यांच्या जीवाशी सरकारने खेळ चालवला आहेत.         मागील काही दिवसांपूर्वी मंत्रालयात उंदरांनी हौदोस घालून अनेक फाईल कुरतडल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच गोरगरीब जनतेला वाटण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातही काही दिवसांपूर्वी मेलेला उंदीर सापडला गेला होता. आता लहानग्यांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने सरकारच्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. हा प्रकार छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. येथील अंगणवाडी शिध्यात मेलेला उंदीर सापडला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या क...

धनराज गुट्टे वंजारी समाजाचा हिरा आहे- डॉ.तात्याराव लहाने

धनराज गुट्टे वंजारी समाजाचा हिरा आहे- डॉ.तात्याराव लहाने.          यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे धनराज गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तात्याराव लहाने यांनी धनराज यांच्याबद्दलची कामाचे कौतुक केले आहे. सूर्य गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर समाजाचे काम करणारा जो कोणी युवा नेता असेल तर तो धनराज गुट्टे आहे असे गौरवोद्गार जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी केले.       यावेळी महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री.प्रविण जी. दराडे साहेब हे उपस्थित होते. दराडे साहेब मोठे भाऊ म्हणून कायम पाठीशी उभे राहत असतात. यावेळी दराडे साहेब यांनी धनराज गुट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दराडे साहेब यांनी सांगितले धनराज गुट्टे यांना कधीही कॉल करा. कधीही प्रवासात असतो. समाजाच्या कामात धनराज ने स्वतःला झोकून दिले आहे. अनेक माणसे पहिले पण धनराज सारखा आणि धनराज च्या कामाची पद्धत असणारा माणूस मी अजून पाहिला नाही.        सेवानिवृत्त जिल्हाधिकारी श्री.गुट्टे साहेब धनराज जी बद्दल कामाच्...

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

एकनाथ शिंदे भाजपला खरंच नको आहेत का? व या मागची काही कारण..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला नकोय या मागची काही कारण.       गेल्या काही दिवसांपासून अजित दादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देखील टीका केली होती की एकनाथ शिंदे हे आता भाजपलाच मुख्यमंत्री म्हणून नको आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या मागची काही कारण.               भाजपने आमदार शिंदे सह शिवसेनेचे आमदार कडून सत्ता स्थापन केली पण त्यांनी जसं ठरवलं होतं तसं मात्र होऊ शकलं नाही. भाजपाचा असा अंदाज होता की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणून शिंदे गटाचे महत्त्व वाढवणे परंतु झालं उलटच या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एक भावनिक लाट तयार झाली तिचा फायदा नक्कीच उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी यांना होणार हे भाजपच्या लक्षात आलं आहे.        एकनाथ शिंदे हे मराठा चेहरा जरी असले तरीसुद्धा त्यांचा म्हणावा इतका प्रभाव पडलेला दिसून येत नाही. त्यातच जर कोर्टाचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला तर सरकार स्थिर होऊ शकतो हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे पूर्वनियोजित योजना म...

अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज.

पंजाबराव डखचा अंदाज अहमदनगर, नाशिकसह 'या' जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज.     महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबराव डख हे वारंवार शेतकऱ्यांना महत्वपूर्ण अशी माहिती देतात. त्यामुळे शेतकरी अगोदरच पुढील तयारी करतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळले जाते. त्यामुळे पंजाबराव डख हा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आज २६ एप्रिल पासून पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पावसाचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार आहे?     पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, या पावसाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत व्यक्त होत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत. तर काही जिल्ह्यात हळद काढणी देखील सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे.  पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे?       पंजाबराव डख...

अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन. एकावर गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन. एकावर गुन्हा दाखल. अहमदनगर मधील अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या.       अहमदनगर मधील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. सदर मुलगी नगर तालुक्यातील पांगरमल येथे राहत होती. तिने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळ चा सुमारास घडली आहे. मुलीचा चुलत्याने एमआयडीसी अहमदनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.        त्या अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्ष होते. मुलीचा चुलत्यानी दिलेल्या फिर्यादनुसार एका जना वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        सदर गुन्हेगार प्रवीण आव्हाड व्यक्तीचे नावे फिर्याद देण्यात आली आहे. गुन्हेगार प्रवीण आव्हाड हा राहणार चिचोंडी शिराळ, पाथर्डी, अहमदनगर येथील असून याचा नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी रोज शाळेला जात होती. या अल्पवयीन मुलीची प्रवीण आव्हाड रोज शाळेला जात असताना, वेळोवेळी छेड काढत होता, असं मुलीचा चुलत्या कडून सांगण्यात आले आहे.         तसेच प्रवीण आव्हाड हा सोशल मीडिया वरून रोज मेसेज आणि व्हिड...